मानव हा समाजशीलप्राणी आहे. त्याला समाजात राहावे लागते. मानवाला समाजात राहूनच भावी जीवन जगावे लागते. जीवन जगण्यासाठी व्यक्तीला आपल्या वर्तनात बदल करावा लागतो. आपल्या वर्तनातूनच समाजातील मूल्यांचा वापर केला जातो.
शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणाने व्यक्तीच्या वर्तनात इष्ट दिशेने बदल केला जातो. त्याने समाजात कसे राहावे, व्यक्तीसमायोजन कसे साधावे, समाजात राहताना नीतीमूल्ये कोणती आहेत, वैज्ञानिक ज्ञान हे व्यक्तीला शिक्षणातून मिळत असते, व्यक्ती अनुभवाने शिकत असतो.
शिक्षणाचा उद्देश म्हणजे बालकांचा सर्वांगीण विकास होय. बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी त्यांच्या भावनिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, बौद्धिक, चारित्रिक, आध्यात्मिक, व्यावसायिक क्षमता, आदर्श नागरिक इ. गुणांचा विकास करून बालकाला परिपूर्ण केले जाते.